सुरुवात एक सोप्या प्रश्नाने करूया…
आपण इतकं का बोलतो भीमाकोरेगाव बद्दल?
दरवर्षी १ जानेवारीला लाखो लोक तिथं का जातात?
का भावुक होतात? का डोळे पाणावतात?
आता १ जानेवारी २०२६ ला २०८ वा शौर्यदिन आपण साजरा करणार आहोत. हा दिवस फक्त एक उस्तव म्हणून न पाहता, ही आपल्या अस्मितेची लढाई जिंकून एक आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्या महार सैनिकांच्या त्यागाची आणि शौर्याची आठवण करून देणारा दिवस आहे.
फक्त “युद्ध झालं होतं” म्हणून नाही…
तर तिथं स्वाभिमान जगला होता, अन्यायाला उत्तर मिळालं होतं आणि “आम्ही काही कमी नाही” असं जगाला दाखवून दिलं होतं.
सामान्य लोकांसारखं समजून घेऊया ही कथा…
जसं आपल्या गावात कुणीतरी आपल्यावर अन्याय करत असतो…
मोठेपण, पैसा, सत्ता, परंपरा, पराक्रम – सगळं त्याच्या बाजूला असतं.
आणि आपण?
लहान, गरीब, दुर्लक्षित…
पण मनात जिद्द! “एक दिवस न्याय करून दाखवणार!”
बस्स!
भीमाकोरेगावची गोष्ट अशीच आहे.
त्या काळाची पार्श्वभूमी – काय चाललं होतं?
१८१७–१८ चा काळ.
पेशव्यांचं राज्य.
सत्ता, अहंकार, जातभेद सगळं उंचावर.
महार समाजावर प्रचंड अन्याय.
“तुम्ही हे करू नका, तिथं बसू नका, देवळात येऊ नका, गावात उजवी वाट धरू नका…”
हा तो काळ.
त्या काळातला महाराष्ट्र आपल्या आत्ताच्या महाराष्ट्रासारखा नव्हता. आज जरी आपण स्वातंत्र्यात जगतो, बोलतो, लिहितो, विरोध करतो… तरी तेव्हा तसं काहीच नव्हतं. त्या काळात पेशव्यांचं राज्य होतं. पेशवे सत्तेत होते, त्यांच्याकडे राज्यकारभार, सत्ता, सैन्य, निर्णय सगळं काही होतं. पण त्या राज्यामध्ये एक मोठा दोष होता तो म्हणजे जातीवर उभा असलेला समाजव्यवस्था. कोण वरचा, कोण खालचा, कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ… हे ठरवून टाकलेलं. काही लोकांसाठी प्रचंड अधिकार, तर काहींसाठी फक्त अपमान, दडपशाही आणि अन्याय.
पेशव्यांच्या काळात अनेक समाजघटकांना “तुम्ही काय करू शकता?” असं विचारण्याऐवजी थेट “तुम्ही काहीच करू शकत नाही” असा शिक्का मारला गेला होता. त्यातच महार समाजाचा समावेश. त्यांना सैनिक होण्याचा अधिकार नाही, शस्त्र हातात घेण्याचा अधिकार नाही, रणांगणात उभं राहण्याचा मान नाही… असा अन्यायकारक नियम. पण मन माणसाचं असतं, त्याला स्वाभिमान असतो. अपमान सहन होत नाही. “मी कमी नाही” हे सिद्ध करायचं असतं. पण संधीच नाही तर सिद्ध काय करणार?
त्याच काळात दुसऱ्या बाजूला ब्रिटिश सत्ता वाढत होती. ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू भारतात पाय घट्ट करत होती. करार, समझोते, तह, कधी युद्ध, कधी राजकारण… असं करत करत कंपनीपुढे पेशव्यांची सत्ता घसरू लागली. पेशव्यांचं राज्य आतून ढासळायला लागलं. आर्थिक ताण, राजकारणातील मतभेद, लोकांशी तुटलेला संबंध… सगळं एकत्र येत होतं. म्हणजे घर दिसायला मोठं पण पाया हळूहळू कमजोर होत चाललेला. आणि जिथं सत्ता कमकुवत होते, तिथं संघर्ष निर्माण होतोच.
या सगळ्यात सर्वात जास्त त्रास कोणाला होत होता माहितेय?
त्या लोकांना ज्यांना आधीच समाजाने बाजूला टाकलं होतं. ज्यांच्या कष्टाचा वापर होतो पण त्यांच्या सन्मानाचा विचार होत नाही. महार समाज त्या काळात जगत होता अशा वातावरणात — काम करा पण मान मिळणार नाही, रक्त घाला पण तुमची किंमत नाही, जगा पण डोळे वर करून नको. समाजातल्या त्या अपमानाने मनात जखम तयार झाली होती. आणि ज्या जखमेवर वर्षानुवर्षं मीठ चोळलं जात होतं.
पण इतिहासाची गंमत अशी आहे की कधी कधी अन्यायच पुढे जाऊन क्रांती घडवतो. पेशव्यांकडे संधी नव्हती, पण ब्रिटिशांनी सैन्य उघडलं, प्रशिक्षण दिलं, बंदूक दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे — “तुम्ही सैनिक आहात, जात नाही… तुमची किंमत आहे.” एवढंच पुरेसं होतं. ज्यांना आयुष्यभर अपमान मिळाला, त्यांना मिळाला सन्मान. ज्यांना नाकारलं गेलं होतं, त्यांना मिळाली ओळख. आणि इथून इतिहासाला वेगळी दिशा मिळाली.
त्या काळाची पार्श्वभूमी म्हणजे फक्त राजकीय स्थिती नव्हती… ती भावनिक ज्वाला होती. पेशव्यांच्या सत्तेतून दबलेला समाज, आणि ब्रिटिशांच्या सैन्यातून मिळालेली नवी ओळख — या दोन टोकांवर उभा महाराष्ट्र होता. एकीकडे जुनी सत्ताकाठ्याची मानसिकता, आणि दुसरीकडे स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द. म्हणूनच माझ्या मते, १८१८ चं भीमाकोरेगावचं युद्ध हे फक्त “ब्रिटिश विरुद्ध पेशवे” एवढंच नसून, ते “अपमानाविरुद्ध सन्मानाचं युद्ध” होतं.
म्हणून जेव्हा आपण त्या काळाची पार्श्वभूमी समजून घेतो, तेव्हा भीमाकोरेगावचा विजय का इतका भावनिक आहे, का इतका महत्त्वाचा आहे आणि का आजही लोकांच्या हृदयात आहे… हे सगळं अगदी स्पष्ट होतं. कारण हा फक्त इतिहास नाही… हा जखमी आत्मसन्मानाने दिलेलं उत्तर आहे.
युद्धात कोण कोण होते?
– एकीकडे – पेशवा बाजीराव दुसरा
मोठ्ठं सैन्य, घोडदळ, तोफा, परंपरा, सत्ता
- पेशवा बाजीराव दुसरा
लढाईचे नेतृत्व
- बापू गोखले
- आप्पा देसाई
- त्रिंबक डेंगळे
दुसरीकडे – ब्रिटिश
त्यांच्याकडे जेमतेम ८०० ते ९०० सैनिक
त्यात बहुसंख्य महार सैनिक ….अनेक इतिहासकारांच्या मते, त्या काळी या लढाईत ५०० महार सैनिक होते
- कॅप्टन फ्रान्सिस एफ.
- स्टॉंटन
महार सैनिकांचे नेतृत्व
- रतननाक
- जाननाक
- भकनाक
सोप्पं सांगायचं तर…
एक बाजू “मोठी”
आणि दुसरी “मनाने मोठी!”
महार सैनिक ब्रिटीशांकडे का?
बरं, हा प्रश्न खूप लोक विचारतात. “महार सैनिक ब्रिटिशांकडे का?”
उत्तर सोपं आहे — जेव्हा आपल्या हातच्यांनीच आपल्याला दूर केलं, अपमान केलं, संधी नाकारली… तेव्हा दुसरं दार उघडलेलं लोक निवडतात.
पेशव्यांच्या सैन्यात त्यांना स्थान नव्हतं. “हे लढूच शकत नाहीत” असा कलंक. समाजात तिरस्कार. दरबारी परवानगी नाही. आत्मसन्मानाला तडा.
पण ब्रिटिशांनी काय केलं?
तो जातीचा दरवाजा उघडला.
बोले — “तुम्ही सैनिक आहात. प्रशिक्षण घ्या. बंदूक घ्या. राष्ट्रासाठी लढा.”
आणि जिथे अपमान नव्हता… तिथे प्राण पणाला लावणं सहजस्वाभाविक होतं. आणि म्हणून महार सैनिक हे बब्रिटीशांकडे होते.
१ जानेवारी १८१८ – ती सकाळ
थंडीचा काळ होता.
भीमा नदीच्या काठावर शांत गाव कोरेगाव भीमा…
पण आज ते रणांगण झालं.
पेशव्यांची सेना विचारात होती – “हे काय करणार? जेमतेम ८०० लोक…”
पण महार सैनिकांनी मनात ठरवलं होतं…
“आज माघार नाही, आज भीती नाही… आज इतिहास लिहायचाय!”
इथंच itihasika07 सारखे लोक म्हणतात –
“इतिहास हा पुस्तकात नसतो, तो रणांगणावर लिहिला जातो.”
युद्ध सुरू झालं… गोळाबारूद, रणशिंग, आरोळ्या
घोडदळ हल्ले करत होतं.
तोफा धगधगत होत्या.
गोल्या चालत होत्या.
एका बाजूला प्रचंड संख्या, दुसरीकडे जिद्द.
महार सैनिक अक्षरशः छाती ताणून उभे राहिले.
“आम्ही मागे जाणार नाही!”
काही सैनिक जखमी होत होते…
काही रणात पडले…
पण कोणी पळाले नाहीत. इथेच महार सैन्याच बळ कळून येत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात—भिमाकोरेगाव युद्ध हे कुठल्याही धर्माचा विजय नाही; तो मानवी प्रतिष्ठेचा विजय आहे. त्यांनी लोकांना हे स्मरण करून दिलं की, ज्या समाजाला शतकानुशतके माणूस म्हणून हक्क नव्हता, त्याच समाजाने मैदानावर उभं राहून शौर्य दाखवलं. त्यामुळे हे युद्ध दलित-बहुजनांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. म्हणूनच त्यांनी १९२७ साली भिमाकोरेगावला भेट देऊन स्मारकास अभिवादन केलं आणि सांगितलं—ही केवळ ऐतिहासिक घटना नाही, तर स्वाभिमान जागवणारी जिवंत प्रेरणा आहे.
रणांगणावरचा खरा संघर्ष
त्या दिवशी युद्ध साधं नव्हतं. परिस्थिती विचित्र होती. ब्रिटिशांची तुकडी कमी होती. युद्धतंत्र चालू. घोड्यावर स्वार सैन्य धाव घेत होतं. गोळ्या झाडल्या जात होत्या. तलवारींच्या धडका लागत होत्या. धूळ उडत होती पण मन ढळत नव्हतं.
इथूनच सुरुवात झाली महारांच्या पराक्रमाची.
त्यांच्या डोळ्यात फक्त दोन गोष्टी होत्या —
एक म्हणजे “युद्ध जिंकायचंच.”
आणि दुसरं — “आज आपण स्वतःला सिद्ध करायचंच.”
तो लढा फक्त ब्रिटिशांचा नव्हता… तो त्यांचं अस्तित्व सिद्ध करणारा लढा होता.
ही लढाई सन्मानाची होती.
दुपार ते संध्याकाळ – निर्णायक वेळ
आता पेशव्यांची सेना थकायला लागली.
इतकं मोठं सैन्य असूनही “ही छोटी तुकडी” देत होती जबरदस्त टक्कर.
लोक म्हणतात ना…
“जे न्यायासाठी लढतात त्यांना देवाची साथ असते.”
संध्याकाळपर्यंत equation उलटली.
पेशव्यांना माघार घ्यावी लागली.
इतिहास इथंच थांबला नाही…
इथून इतिहास “बदलला”.
महारांचा पराक्रम – अभिमानाची कथा
आज ही कथा फक्त युद्धाची नाही.
ही कथा आहे स्वाभिमानाची, न्यायाची, प्रतिकाराची.
तुम्ही विचार कर…
ज्यांना “नालायक, नीच, अयोग्य” म्हणलं जात होतं
त्यांनी युद्धात इतका पराक्रम केला की…
ब्रिटिशांनी त्या सैनिकांची नावे विजयस्तंभावर कोरली!
जगासमोर मानाचा मुजरा.
आज भीमाकोरेगावचं महत्त्व काय?
आज लाखो लोक तिथं जातात.
कुणाला राजकीय अर्थ वाटतो…
कुणाला सामाजिक…
पण बहुतेकांसाठी तो दिवस म्हणजे…
आपण कमी नाही! आपण लढू शकतो! आपण जिंकू शकतो!
आजचा तरुण जेव्हा तिथं उभा राहतो तेव्हा त्याच्या डोळ्यात फक्त इतिहास नसतो…
तेथे असतो स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान.
इथंच itihasika07 ची खरी भूमिका असते –
इतिहास फक्त सांगायचा नाही, तो “जिवंत करून दाखवायचा”.
माझं वैयक्तिक मत – मनापासून सांगतो
माझ्या दृष्टीने भीमाकोरेगाव म्हणजे फक्त भूतकाळ नाही…
तो वर्तमान आहे, भविष्य आहे.
तो शिकवतो –
- अन्याय झाला तरी झुका नका
- संधी मिळाली तर सिद्ध करून दाखवा
- स्वतःबद्दल कमीपणा बाळगू नका
- लढलात तरच जिंकण्याची संधी असते
आजच्या तरुणांना, विद्यार्थ्यांना, समाजाला हा संदेश खूप मोठा आहे.
जर इतिहासाला मानवी हृदय असतं तर ते भीमाकोरेगावच्या रणांगणात धडधडलं असतं.
आणि जर इतिहासाला आवाज असता तर तो म्हणाला असता…
“हा दिवस विसरू नका. हा फक्त भूतकाळ नाही,
हा आपला स्वाभिमान आहे.”
शेवटचं मनापासून…
ज्यांनी लढून इतिहास लिहिला…
त्यांचं स्मरण करणं ही जबाबदारी आहे.
आणि त्यामुळेच itihasika07 सारखे प्लॅटफॉर्म्स खूप मोठं काम करतात.
कारण ते फक्त लिहित नाहीत…
ते इतिहास “जिवंत” ठेवतात.
निष्कर्ष
भीमाकोरेगावची कथा म्हणजे…
शौर्य आहे, स्वाभिमान आहे, प्रेरणा आहे,
आणि आपली ओळख आहे.
आपण सगळ्यांनी हा इतिहास समजून घ्यावा,
आपल्या मुलांना सांगावा,
आणि स्वतःला आठवण करून द्यावी की…
आपण कमी नाही. आपण लढणारे आहोत.
आणि जो लढतो… तोच इतिहास बनवतो!
FAQ’s
१ जानेवारी २०२६ ला कितवा शौर्यदिन आहे ?
१ जानेवारी २०२६ ला आपण 208 व शौर्यदिन साजरा करत आहोत.
भीमाकोरेगाव युद्ध कधी झाले?
१ जानेवारी १८१८ रोजी पुण्याजवळील भीमा नदीच्या काठावर हे युद्ध झाले.
या युद्धात कोण लढले?
पेशवा बाजीराव दुसऱ्यांची सेना आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सेना (ज्यात मोठ्या संख्येने महार सैनिक होते).
युद्धात कोण जिंकले?
संख्येने कमी असूनही ब्रिटिशांना विजय मिळाला आणि पेशव्यांना माघार घ्यावी लागली.
महार समाजाची भूमिका महत्त्वाची का?
महार सैनिकांच्या अप्रतिम शौर्याने ही लढाई निर्णायक ठरली; त्यामुळे हा दिवस स्वाभिमानाचे प्रतीक मानला जातो.
आजही भीमाकोरेगाव का साजरा केला जातो?
कारण हे युद्ध सामाजिक न्याय, समता आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जाते.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल,
▶ Itihasika07 ला Follow करा
▶ ही पोस्ट इतरांपर्यंत पोहोचवा
▶ आणखी अशा प्रेरणादायी कथा वाचा


